Monday, October 4, 2010

कास पठार,सज्जनगड,ठोसेघर

१८-१९ सप्टेम्बर २०१०

नुकताच गणपतीचा सीझन संपला होता.त्यामुळे विश्रांतीची गरज होती.म्हणून कास ल़ा जायच मनात असूनसुद्धा टाळत होतो.शुक्रवारी नोटीस बोर्डवर नाव पाहिली.त्यात एक नाव होत "मैत्रेयी".लगेच निर्णय घेतला "जायच".मालकाना तस सांगीतल आणि तयारीला सुरुवात केली.२ दिवसांची ट्रिप.त्याला आवश्यक कपडे आणि इतर सामान गोळा कल.आल्याच्या वड्या,आवळे घेतले.सेल चार्ज करायचे होते.पूर्ण दिवस तयारीत गेला.मला ट्रेक च्या आदल्या दिवशी झोप लगत नाही.सर्व रात्र न पाहिलेल्या कास पठाराच स्वप्न बघत काढली.

Monday, July 19, 2010

कातळधार चा धबधबा

१८ जुलै २०१०
२/३ दिवस पावसाचं नाव नाही.धबधबा कोरडा असला तर?उगाच भीती.पण ठरवलं जायचं.१३ जण जमले.९ ज Qualis मधून.२ जण इंद्रायणी ने आणि १ बाइक वरून आणि अभिजित.८ वाजता लोनावला इथे एकत्र जमलो.आणि पुढे निघालो.
कुणे गावाशी आलो.गाड़ी पार्क केली.तिथेच इडलिचा नाश्ता केला आणि पुढे निघालो.राजमाची ल़ा जो रास्ता जातो तय रस्त्यावर एके ठिकाणी एक रस्ता खाली उल्हास vally त उतरतो.या पॉइंट पासून पूर्ण उतारच उतार.फ़क्त उतरत जायचे.वाटेत फ़क्त जंगल आणि जंगल.हे जंगल फसवं आहे.अनेक ठिकाणी रस्ता भरकटू शकतो.वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक दगड ठेवले आहेत.त्यांच्या आधारे २ तासात आपण कातळधार ला पोहोचतो.धबधबा बारीक च होता.त्यामुळे अगदी खालपर्यन्त जाता आले.सगळ्यानी मनसोक्त पोहुन घेतले.तिथेच एका कड्यात निसर्गनिर्मित घळ आहेत.तिथे sandwitch चा आस्वाद घेतला आणि परतीला निघालो.

Tuesday, June 22, 2010

आजोबा ट्रेक

सह्यपर्वताच्या माथ्यावर-कुशीत आणि पायथ्याशी अनेक स्थळं अशी आहेत की,त्यांच्याशी धार्मिक कथा गुम्फलेल्या आहेत आणि आदिवासी मानवाने त्या गाभारयातल्या देवतांप्रमाणे श्रद्धेने जपलेल्या आहेत.आजोबा पर्वताचा परिसर असाच आहे.रामयणातील उत्तरकांडाचा विषय याच्याशी निगडित आहे.आजोबा म्हणजे रामराजाचा आजोबा-वाल्मीकि ऋषी.यांचा आश्रम येथे होता आणि सीता लव-कुशाना घेउन येथे राहिली होती,अशी कथा सांगतात.नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर शहापुर तालुक्यातील वाल्मीकि आश्रम पोटाशी असलेला आजोबा पर्वत डोंगरमार्गासाठी उत्कृष्ट आहेच,पण सोप्या चढाईमुळे सामान्य पर्यटकांनाही आवाक्यात आहे.आजोबा पर्वताची उंची १३७५ मीटर आहे.वल्मिकिचे देउळ मराठ्मोळं कौलारू,आसपासच्या निसर्गाशी तादात्म्य पावणारं असच आहे.देवळात वाल्मीकि समाधिचा चौथरा आहे.बाहेर यज्ञवेदी आहे.सीतेच्या दुसरया वनवासात ती येथे राहिली.कातळकड्यात सीतेचा पाळणा
अशी जागा आहे।
दिनांक २७.६.२०१०
आदल्या रात्रि "स्मिता पाटिल नावाचा प्रवास" कार्यक्रम बघून आलो होतो.रात्रीच स्पेन आणि चिली ची मैच बघितली.दुसरया दिवशी आजोबा वर स्वारी.पण झोप लागायच नाव नाही.६ वाजता शांतिप्रियाला आणायला गेलो.शांतिप्रिया आली डुलत डुलत कुत्रे वाचवत वाचवत.आल्यावर म्हणते कशी "अय्या!wind cheater राहिल." म्हटल "जा.घेउन ये लवकर" तिला सोडल स्टेशनवर.तोच आला भानुप्रियाचा मेसेज "waiting for train.no train running" असा मेसेज करतात की वाटत ट्रेन चा स्ट्राइक आहे की काय.मग लगेच दूसरा मेसेज."got the train at 5.50..... reaching in 20 min" हा हा हा!!! It makes me crazy and amuses me as well.घरी आलो.माझ्या बैग घेतल्या आणि खाली आलो.म्हटल काहीतरी विसरतोय.camera.....परत वर गेलो.camera घेउन निघालो.स्टेशन वर भानु,superman आणि शांति उभ्या.मी पण जाउन तिथे उभा राहिलो.qualis ची वाट बघत.१५ मिनिटानी जितुचा फोन "गाडी पंक्चर.आणि टायर चे नट उघडता येत नाहीयेत।" बोम्बला......मग superman ला म्हटल "काका तुम्ही निघालात तरी चालेल " ते गेले निघून.मी,भानु,शांति आडोशाला उभे राहिलो.या दोघी घुसल्या बाजूला उभ्या असलेल्या एका ड्रायव्हर विरहित रिक्षात.काही वेळाने धृति आली.more पासून चालत चालत.मग आम्ही ठरवल की more लाच जाउया.मग विचारल रिक्शा वाल्याना.कोण म्हणाल २० कोण ६ रु सीट.मग चढलो बस मधे.आणि टिकिट झाल २० रुपयेच.हा हा हा!!!!!असो.मग पोहोचलो एकदाचे.तिकडे सीन मजेशीर होता.अभिजित गाडीखाली.घोल्या नट उघडायच्या spanner वर उभा.बाकी सगळे footpath वर पडीक.जीतू गायब.किस्सा असा होता की हे सगळे गेला अर्धा तास जो प्रयत्न करत होते तो नट उघडायचा नसून जास्तच tight करायचा होता.गम्मत आहे की नाही.असो.अथक प्रयत्नानंतर एकदाचे बसलो गाडी मधे.भानु शांति तेवढ्यात pattis घेउन आल्या.किती गोड मुली ह्या.असो.१२ जणांचा आमचा ग्रुप.१० जण क्वालिस मधून आणि दोघे बाइकवरून.डोळखांबपर्यंत आम्ही क्वालिस ने पोहोचलो.तिथून पुढे साकुर्लिपर्यंत गेलो.डोळ्खांबला आम्ही न थांबल्यामुळे मागुन येणारया बाइक वाल्याना वाटले आम्ही रस्ता चुकलो आणि ते परत मागे फिरले.आम्ही साकुर्ली जंक्शन ल़ा वाट बघत थांबलो.शेवटी एकदाचा फ़ोन लागला जितुला आणि सगळे परत एकत्र झालो.पायथ्याच्या गावात नाश्ता केला आणि आजोबा कड़े कूच केलं.पावसाचं नाव नव्हतं.काही मिनिटात प्रचंड हीट जाणवायला लागली.विचित्र गरम होत होतं.उन भाजून काढतय असं वाटत होतं.सगळ्यांचा पोंगा झाला होता.१ १/२ तासांच्या चढाईनन्तर एके ठिकाणी सीतामाई च्या पाळण्याचा कड़ा आणि आजोबा दिसायला लागला.जाताना मधे मोठे पठार लागले.पठारावर काही फोटो काढू पुढे सरकलो.साधारण १/२ तासाने वाल्मीकि आश्रमात पोहोचलो.परिसर अत्यंत रम्य.वडाचं झाड़.त्याच्या शेजारची कौलारू धर्मशाला.वाल्मीकि आश्रम.सगळंच सुन्दर.थोडावेळ थाम्बुन पारंब्यांवर झोक्याचा आनंद घेतला.मग निघालो सीतेच्या पाळण्याकडे.अजुन पावसाचं नाव नव्हतं.तिथे जायचा रस्ता एक घळीतून आणि जंगलातून.तासभराच्या खडया चढ़ाईत दमछाक झाली.मग मात्र जे दृश्य बघितले त्याने डोळ्यांचे पारणे फिटले.अजस्त्र ड़ोंगरांची रांग.मधून दिसणारे सुळके.एका धबधब्याची छोटीशी सफ़ेद धार.आणि सावल्यांचा खेळ.अप्रतिम दृश्य डोळ्यात टिपून घेतलं.कारण camera मधे काहीतरी लोचा झाला.सीतामाई च्या पाळण्याचा कड़ा आणि आजोबा यांच्या मधल्या "V" मधे पोहोचलो.आणि लागला तो १० १५ फुटांचा rockpatch.एव्हाना पाउस धो धो कोसळायला सुरुवात झाली होती.rock patch चढायला काही आधारच नव्हता.गंजलेली मोडकी शिडी.सगळ बुळबुळीत झालं होतं.आणि पलिकडे पूर्ण exposure.नाद सोडून दिला आणि परतीला लागलो.१ तासाच्या जोरदार पावसामुळे धबधबा तयार झाला होता.त्यात मनसोक्त भिजलो.उतरताना समोरच्या डोंगररांगेतल्या छोट्या धबधब्यांचे मोठ्यात रूपांतर झाले होते.४ वाजले परत आश्रमात यायला.प्रचंड भूक लागली होती.बकाबक खाल्ल आणि परतीच्या मार्गाला लागलो.

Wednesday, June 2, 2010

माझी कोकण वारी


स्थळ: मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक १७ ,वेळ : सकाळी ७............रस्ता आता चाकाखालचा झाला आहे.अजुन बरच जायच आहे.चहा घ्यायलाच हवा.तरतरी येईल.पनवेल-पेण-नागोठाणे-माणगाव-महाड-चिपळूण आणि मग गुहागर.रस्ता,ट्रक,एसटी साथ देत राहतात.

Thursday, April 15, 2010

पारसिक चा किल्ला

मुम्ब्रा जवळचा पारसिकचा डोंगर बरेच दिवस चढायचं मनात होतं.पण योग यावा लागतो म्हणतात ना तसा तो जुळून आला.एप्रिल महिन्यात छोटा ट्रेक करायचं ठरलं.पहाटे निघून दुपारी घरी परत येता येइल असा.त्या दृष्टीने पारसिक उत्तम ट्रेक आहे.पहाटे ५.३० ल़ा निघून सगळी टीम मुम्ब्र्याला एकत्र जमली आणि ट्रेक चा श्रीगणेशा केला.सर्वप्रथम मुम्ब्रादेविचे दर्शन घेतले.मुम्ब्रा शहराचं दर्शन पहाटे प्रथमच घेत होतो.एका बाजूला धुक्यात हरवलेली उल्हास नदीची खाड़ी,दूर दिसणारे दिवा शहर,खाली वाहता रस्ता मुम्ब्रा बायपास आणि वरून बघता जमीन दिसणार नाही असे दाटीवटीचे मुम्ब्रा शहर....सगळे रम्य.सूर्योदय होता होता चढाईला सुरुवात केली.मुम्ब्रा कडून पारसिक चा डोंग चढायचा मार्ग आहे एका घळीतून .मुम्ब्रादेवी देवळाच्या पायऱया उतरून थोड़े ख़ाली उतरले की उजव्या हाताच्या दुसरया घळीतून वर जाण्याचा मार्ग आहे.हा मार्ग हड्सरच्या नळीच्या वाटेची आठवण करून देतो.दोन डोंगरांच्या मधे अडकलेल्या दगडांच्या कधी खालून कधी वरुन कधी लोकांच्या पायाचा खान्द्यांचा शिडिसरखा वापर करत वर पोहोचलो.वर पोहोचल्यावर उजव्या बाजुच्या डोंगरावर चढ़ाई केली.मुम्ब्रादेवी देवळाच्या बाजूला एक कातळभिंत आहे.गिर्यारोहक ही भिंत चढून ज्या ठिकाणी पोहोचतात तिथे एक झेंडा त्यानी विजयाचं प्रतिक म्हणू लावला आहे.त्या ठिकाणी पोहोचलो.या ठिकाणची ऊंची २०० मीटर म्हणजे ६०० फूट आहे.६०० फुटावरुन दिसणारे मुम्ब्रा शहर अणि परिसर अवर्णनीय.तिथे थोडावेळ थाम्बुन खाली उतरून पारसिक पिनॅकल च्या दिशेने कूच केले.थोडं जंगल थोड़ी मोकळी जगा अशा वाटेने हसत खिदळत रस्ता कधी संपला ते कळलच नाही आणि आम्ही एका महादेवाच्या देवळापाशी आलो.देवळाला भिंती नाहीत.नुकतेच कोणीतरी पूजा करून फुल वाहून गेलं होतं.तिथे थोडा वेळ थाम्बुन खालच्या अंगाला असलेल्या दुसरया एका घरापाशी आलो.इथे कोणीतरी रहात असावं.या घराच्या खालच्या बाजूला एक विहीर आहे.विहिरीतून पाणी काढायला दोरी आणि बादली आणली होती पण विहीर बरीच खोल असल्यामुळे दोरीला ओढ़णी बांधली आणि काम झालं.थंडगार पाणी तोंडावर मारून ताजेतवाने झालो आणि बरोबर आणलेल्या टोस्ट सँडविच आणि ताकावर ताव मारला.आता थोड़ी विश्रांति हवी होतीच त्यामुळे एका झाडाच्या सावलीत निद्राधीन झालो.थोड़े ताजेतवाने झाल्यावर उतरण्यासाठी कूच केले.पारसिक च्या पठारावरून कळव्यात उतरायला सोपा रस्ता आहे.पुढच्या वेळी त्या रस्त्याने उतरायचं नक्की केलं.थोड्या अंतरावर एक मारुतीची मूर्ति असलेली घुमटी लागली.त्याच्या पलिकडील बाजुस पारसिक बोगद्याच्या कलवा बाजूचे कलवा आणि ठाणे शहराचे दृश्य डोळ्यात साठवत पुढे झालो.पारसिक पिनॅकल च्या सोंडेवरुन मुम्ब्रा बायपास रोडवर उतरता येते.हा रस्ता थ्रिलिंग आहे.तो सावधानतेने पार करत एका कबरिपशी रोडवर उतरलो.

Monday, January 18, 2010

हडसर

नाणेघाटातून होणाऱया व्यापारावर नियंत्रण ठेवणारी दुर्गचौकड़ी म्हणजे जीवधन,शिवनेरी,चावंड आणि हडसर.जीवधन,शिवनेरी,चावंड बघून झाले होते.हडसर बाकी होता.मागे निमगिरील़ा गेलो होतो तेव्हा हडसर करायचा बेत होता.पण तो काही कारणामुळे फसला।

हडसर चढ़ायचे दोन रस्ते.एक मुख्य दरवाजातून जाणारा पायरयांचा आणि दूसरा खुंटीची वाट.ती वाट thrilling आहे असे ऐकून होतो.तेव्हा त्या वाटेने वर चढ़ायचे व पायऱयांच्या वाटेने उतरायचे ठरले.पहाटे ६ वाजता निघालो आणि माळशेज घाटातल्या आमच्या नेहमीच्या नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो.पण रस्त्याचे काम चालू असल्यामुळे बोगद्याच्या पलीकडल्या जागेत रस्त्यावरच नाश्ता केला.९.३० च्या सुमारास हडसर गावात पोहोचलो.खुंटीच्या वाटेपर्यंत १/२ तासात पोहोचलो.कड्याच्या खली पोहोचल्यावर कड्यात साधारण ५० फुटावर एक घळ दिसत होती.पण कड्यात पायऱया नव्हत्याच.नुसत्याच खोबणी होत्या.हा माझा पहिला ट्रेक ज्यामधे वर चढायला पायऱया नव्हत्या.राजगडाचा बालेकिल्ला,जीवधन याना जश्या पायरया आहेत तश्या इथे नाहीत.उभाच्या उभा कड़ा आहे त्यात हात अडकवायला खोबणी आहेत.विशेष गोष्ट अशी की या पूर्ण ५० फुटाच्या कातळात विशिष्ट अंतरावर दगडात लोखंडाच्या खुंट्या ठोकल्या आहेत.त्या सीमेंट ने पक्क्या केल्या आहेत.त्या धरायच्या व त्यांच्या आधाराने शरीर खेचत वर जायचे.जितुने सांगितले होते की गोगटे मावशी या वाटेने गेल्या होत्या त्यामुळे आम्हाला चढ्णे भागच होते.पहिल्यांदा पूर्ण exposure मधे चढत होतो.जीतू आधी पूर्ण वर जाउन परत ख़ाली आला.त्यामुळे साधारण अंदाज आला.मग बाकिच्याना कसे चढ़वायचे त्याचे planning करून मी सगळ्यात आधी २ मिनिटात वर पोहोचलो.म वर आले "माझे बाबा".त्यांचे वय ६२.त्यामुळे काळजी होती.पण जीतू अणि अभिजित च्या प्रयत्नानी ते वर पोचले.नंतर धृति,दीपिका,प्रचिती आणि मग सगळे टोणगे वर चढले.रोहित ने सगळ्या बुटांच्या लेस एकमेकात अड्कवल्या आणि रोप च्या सहाय्याने ते व घेतले.एक टप्पा पार केला.तशी जीतू म्हणाला वर अजु एक "छोटासा" patch आहे.होता छोटासाच पण तो ही exposure वाला.त्यालाही खुंट़या ठोकल्या होत्या.तो ही टप्पा पर केला अणि एकदाचे वर पोहोचलो.तिथे एक ग्रुप फोटो घेतला.बुरुजा वरच्या झेन्ड्याजावळ काही जणानी फोटो सेशन केले आणि पुढे निघालो.वाटेत हनुमानाची मूर्ति,पाण्याचे टाके,पडके देउळ,दगडी परात असे बघत बघत शंकराच्या देवळापाशी पोहोचलो.देउळ काळ्या दगडात बांधलेले,टुमदार अणि अतिशय सुन्दर आहे.आतमधे शंकराची पिंडी,गणेश व गरुडाच्या मूर्ति आहेत.बाहेर नंदी आहे.

चारही बाजूला माणिकडोह जलाशय,शहाजिसागर धरण,सिन्दोळा किल्ला,शिवनेरी,चावंड किल्ला,नाणेघाट,लेण्याद्रि चा डोंगर,जीवधन असे रमणीय दृश्य दिसते.सळे बघितल्या वर भरपेट जेवण केले आणि सगळे आपापले छोटे छोटे ग्रुप करून झोपेच्या स्वाधीन झाले.आराम करून झाल्यावर गडाची भटकंती चालू केलि.थोड्या अंतरावर जमिनीच्या ख़ाली एक रस्ता गेला होता त्याने आत शिरलो.आत मध्ये तीन खोल्या होत्या.प्रत्येक खोली मधे आत मधे कोरलेल्या कोठया होत्या.सगळे एक दगडात कोरलेले.आणि कोरीव काम सुद्धा सुन्दर.तेथून वर आलो आणि मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो.सगळ्या पायऱया एकाच दगडात कोरलेल्या.त्यामुले आश्चर्याचा धक्का बसतो.दरवाज्याच्या चौकटी तर अप्रतिम.ख़ाली उतरायचा रस्ता लांबचा असल्यामुळे short कट वापरायचे ठरले.रस्ता एका घळीतून ख़ाली उतरणारा होता.हळुह्ळु सगळे ख़ाली उतरलो.साधारण ६.३० वाजले होते.गाडीत बसल्यावर प्रचंड भूक लागली होती.वेफर्स,चिवड़ा,पेढे,संत्र यांच्या वर ताव मारला.डोंबिवलीला पोहोचायला १० वाजले.आणि एका थ्रिल्लिंग ट्रेक ची सांगता झाली.

watch the video : http://vimeo.com/8882040

Saturday, January 2, 2010

मंगळगड उर्फ़ कांगोरी



मंगळगड उर्फ़ कांगोरी

डोंबिवली हुन १ सीटर मिनी बसने रात्री १२ वाजता निघालो.पहाटे ४.३० - ५ च्या सुमारास महाड ल़ा पोहोचलो.धु्कयामुळे गान्धारपाले शोधायला वेळ लागला पण रोहित च्या GPRS ने काम केले.शेवटी मिलाली लेणी एकदाची.सगळे ५-१० मिनिटात वर पोहोचलो आणि लगेच पथारी पसरल्या.६-६.३० ल़ा समोरच्या क्षितिजावर होणारा सूर्यास्त फार छान दिसत होता.जितुने चहा केला.तो घेउन सर्व लेणी बघून पुढे निघालो.१० वाजता पिंपळेवाडी या गडाच्या पायथ्याच्या गावी पोहोचलो.रस्त्यात बसूनच इडलीचा नाश्ता केला.गावातला एक "नाना पाटेकर" गाइड म्हणून यायला तयार झाला.आम्ही चढायला सुरुवात केली.नाना पाटेकर ने गोगटे मॅडम ची सॅक घेतली.तिथेच शंकेची पाल चुकचुकली.थोड़े अंतर चढल्यावर पैशांवारून नाना घासाघीस करायला लागला.त्याला 'वट लो' केले आणि आम्ही परत चढायला लागलो.सगली चढण उभी.सुरुवातीपासून शेवटपर्यंत.कुठे लू सॉइल कुठे पिवळे गवत.या गडावर चढताना सरळ सरळ वर चढत जायचे.एका ठिकाणी सावलीत विसाव्यासाठी थांबलो.संत्री,कॉर्न,लिम्बू सरबत,गोळ्या यांचा आस्वाद घेतला आणि परत चढायला लागलो.गडाचा आडवा कड़ा लागल्यावर कड्याखालून traverse चालायला सुरुवात केली.जंगलातून वाट काढत दरवाज्यापाशी पोहोचलो.दरवाजा शिल्लक नाही.वर आलो अणि समोर दिसले ते कांगोरी देवी चे छान से देऊळ आणि कांगोरी माची.चहुकडे सह्याद्रीच्या रांगा.मागे दिसतो तो कांगोरी चा बालेकिल्ला.कांगोरी देवी मंदिराकडे जाताना उजव्या हाताला खाली पाण्याची टाकी लागली.५ मिनिटात मंदिरात पोहोचलो.छोटेसे पण आकर्षक असे हे देऊ आहे.त्या देवळात जेवण केले.जितूने एकीकडे मस्त सूप बनवले.जेवायला sandwich होते.जेवण झाल्यावर देवळाच्या मागे माचीच्या टोकापर्यंत जाउन आलो.परत येउन देवालत थोड़ी विश्रांति घेउन मग बालेकिल्ला सर केला.तिथे पण पाण्याचे बऱ्यापैकी मोठे असे टाके आहे.एक पडकी ईमारत आहे आणि बाकी झाड़ी आणि गवत.६ वाजता परत यायला निघालो.१० वाजता डोंबिवलीला पोहोचलो.