Friday, May 6, 2011

माहुलीला घडलेला अप्रिय अपघात

व्यक्तींची नावे बदलली आहेत.प्रसंग खरा अहे.

३१ मे १९९७

"सह्यमित्र" संस्थेचा ग्रुप ट्रेक होता माहुलीला.महेश होता लीडर.महेश आणि ग्रुप शिडीच्या वाटेने वर जाणार होते.महेशच्या काही मित्रानी कल्याण दरवाज्याने वर चढायचे ठरवले.महेशने त्याना विनंती केली की ग्रुप ट्रेकला तुम्ही असं करू नका.इतर वेळी ठीक आहे.पण म्हणतात ना गोष्टी घडायच्या असल्या की घडतातच.एकुण ६ जणानी कल्याण दरवाजा रूट घ्यायचे ठरवले.त्यांच्या मधे एक अगदी नवीन ट्रेकर आणि एक मुलगीही होती.रूट आहे तसा अवघड.जंगलातून वाटा सापडत नाहीत आणि मधे येणारे rock patches त्यामुळे सहसा त्या वाटेने कुणी जात नाहीत.पण...........

प्रकाश आधी महेश लाच join करणार होता.पण काही कारणामुळे त्याला जामले नाही आणि त्याने त्या ६ जणाना join व्हायचे ठरवले.प्रकाश तसा अनुभवी ट्रेकर.या आधी त्याने अलंग मदन कुलंग केले होते आणि काही ट्रेक तर अगदी एकट्याने सुद्धा.ट्रेकला अगदी sleepers सुध्दा घालत असे तो.यावेळीही त्याने sleepers घातल्या होत्या बहुदा.भविष्य बघायचा त्याला छंद होता.का कुणास ठाउक पण तो म्हणत असे "मी अल्पायुषी आहे".गम्मत म्हणुन असेही म्हणे की "मरण यावं तर किल्ल्याच्या सान्निद्ध्यात".

एव्हाना महेश किल्ल्यावर पोहोचला होता.किल्ला सगळा बघुन झाला आणि भटोबा pinnacle च्या बाजुच्या पठारावर चहा चा बेत करण्यात आला.कल्याण दरवाजा जवळपासच असल्यामुळॆ सर्व जण त्या ७ जणांची वाट बघत होते.

प्रकाश आणि इतर ६ जण सकाळी निघाले असावेत बहुतेक.वाटा मिळणे अवघडच जात होते.आणि त्यात ३१ मे चा दिवस.उन नुसते रणरणत होते.तहान तहान होत होते.आणलेले थोडेफ़ार पाणी लगेच संपले होते.कधी एकदा वरच्या ग्रुपला भेटतोय असे प्रत्येकाला वाटत होते.आणि त्यात अगदी नवख्या माणसाला त्या रूट ने आणणे म्हणजे ट्रेक लीडरवर दडपण होतेच.लीडर अर्थातच प्रकाश होता.अनुभवी होता ना तो.सर्व अडथळे पार करत ते ७ जण तुटलेल्या पायरया आहेत तिथपर्यंत येउन पोहोचले.इथे एक अवघड असे एक वळण घ्यावे लागते.patch च्या वर एक टेपाड आहे.त्यावर पिवळे गवत माजले होते.प्रकाश एकटाच मागे राहिला होता कशामुळे तरी.बाकीचे ६ जण कसा बसा तो patch पार करुन कल्याण दरवाज्यात पोहोचले सुद्धा.प्रचंड तहान लागली होती त्याना त्यामुळे वर जायचे त्राण उरले नव्हते.त्यातला एक जण वर चढुन आला महेश कडे आणि सगळ्याना पाणी घेउन परत कल्याण दरवाज्यात गेला.एव्हाना प्रकाश patch जवळ पोहोचला होता.वरुन महेश आणि मित्र त्याला बघु शकत होते.प्रकाश टेपाडापर्यंत पोहोचला.आणि त्याने पिवळ्या गवतावर पाय ठेवला आणि............काही कळायच्या आतच तो त्या गवतावरुन घसरला........इथुन खाली ५०० फ़ूट fall आहे...........महेश ने प्रकाशला कड्यातून निसटताना आणि खाली दरीत कोसळताना पहिले आणि प्रकाश दिसेनासा झाला........महेशच्या पोटात धस्स झाले.पण तो काय समजायचे ते समजुन चुकला होता.कल्याण दरवाज्यातल्या कोणालाही याची जरासुद्धा कल्पना नव्हती.

महेशला आता पटापट निर्णय घ्यायचे होते.घटना समजताच ट्रेक तिथेच cancel करण्यात आला.सर्वजण शिडीच्या वाटेने खाली उतरले.त्याना ट्रेन ने घरी पाठवण्यात आले.आता प्रकाश चा शोध घ्यायचा होता.तो वाचण्याची शक्यताच नव्हती.rescue साठी आणि जर काही कमीजास्त झाले असले तर tyachI body शोधण्यासठी ropes आणि ५/६ climbers ची टीम आणण्यासाठी महेश कल्य़ाण ला पोहोचला.सगळ्याना फ़ोन करण्यात आले.फ़क्त प्रकाशच्या घरी काही कळवण्यात आले नाही.दुसरया दिवशी सकाळी सर्वजण माहुलीला पोहोचले.गावकरी मदतीला घेउन बरयाच प्रयत्नांनंतर प्रकाशचा छिन्नविच्छिन्न झालेला देह त्यांच्या हाती लागला.देह फ़ुगला असल्यामुळे बराच जड झाला होता.कसाबसा तो माहुली खालच्या गावात आणण्यात आला.गावकरी तयार होइनात.त्याना दारु पाजण्यात आल्यानंतरच त्यानी तो खाली आणला होता.तिथुन body शहापूर ला हलवण्यात आली.तिथे तिचे nominal post mortem करण्यात आले आणि नंतर dead body प्रकाश च्या घरी भांडुपला नेण्यात आली.अजुनही शोकांतिकेचा अंत झाला नव्हता.जिल्हा बदलला की death चे पेपर्स verify करावे लागतात त्यामुळे स्मशानात ते विचारण्यात आले.मग राजावाडी hospital मधे जाउन सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तब्बल ७२ तासांनंतर प्रकाशच्या देहाला अग्नी मिळाला.

आदल्या दिवशी महेशने प्रकाशच्या वडिलाना फ़ोन केला."काका एक अपघात घडलाय प्रकाशला.आपल्याला शहापूरला जायचय." वडील म्हणाले "महेश....खरं काय ते सांग.तो गेलाय का?".....महेश ला काय बोलायचं ते सुचत नव्हत....जड अंत:करणाने तो म्हणाला "हॊ"........काय अवस्था झाली असेल त्या वडिलांची?..........

सर्वच जणांसाठी..........नातेवाईक,मित्र,ट्रेकर्स.....सगळ्यांसाठी अतीशय ह्र्दयद्रावक आणि दु:खद अशी ही घटना घडली.

हा एक अपघात होता.पण तरीही...........

माझी सर्व ट्रेकर्स ना कळकळीची विनंती आहे की या घटनेपासुन बोध घेउन काही मूलभूत नियम जर सर्वांनी पाळले तर अशा घटना टाळता येतील.....

wish U all happy and Safe trekking.........

Life is precious......value it and enjoy..........

Monday, May 2, 2011

सांधण चा फ़ट्टांग ट्रेक

माहुली,अशेरी आणि पदरगडाच्या ट्रेक नंतर एप्रिल महिना उकाड्यामुळे आणि ट्रेक मित्रांच्या वैयक्तिक कारणांमुळे ट्रेक शिवायच गेला।:( त्यामुळे re re shedule करत सांधण valley चा ट्रेक एकदाचा १ मे ला ठरला.पंकजचा blog वाचला होता आणि महिनाभर google map,picassa albums आणि जिथे जिथे माहिती मिलेळ तिथुन भरपुर वाचलं होतं.त्यामुळे सांधण valley त जायची प्रचंड उत्सुकता होती.
३० एप्रिलला २७ जणांची jumbo team डोंबिवली हुन रात्री १२ वाजता निघाली.आयत्या वेळी अजय ऐवजी रोशनी आणि महेन्द्र ऐवजी वैभव अशा replacement झाल्या.सुनिल शिंदेला मानगड नंतर ५/६ वर्षांनंतर भेटत होतो.त्यामुळे भरपुर गप्पा मारल्या.त्यामुळे सब बेटे "नाराज" हो गये....:( मित्रा नितेश मला माफ़ कर.अशी चूक मी परत करणार नाही.!!!कसारा घाटात चहा साठी थांबलो आणि मग पहाटे ५ वाजता घाटघर धरणाजवळ आश्रमशाळेत पोहोचलो.पब्लिक झोपी गेलं आणि मी,प्रणय,निरु आणि सुनील थोडावेळ फ़ेरफ़टका मारला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला.८ वाजायच्या सुमारास इडलीचा नाश्ता करुन २ किमी वर असलेल्या साम्रद गावात पोहोचलॊ.थोडावेळ फ़ोटो सेशन करुन सांधणकडे कूच केले.खुट्टा सुळका,रतनगड,अलंग,मदन,कुलंग सगळॆ धुक्यात लपले होते.साधारण ४५ मिनिटे चालल्यानंतर एका तुटलेल्या कड्याच्या टोकाशी पोहोचलो.इथुन सांधण valley च्या बाजुला असलेल्या मिनी कोकणकड्याचे रौद्रभीषण दर्शन घेता येते.आजोबा डोंगर,करोली घाट,सीतेचा पाळणा,रतनगड,खुट्टा सुळका,बाण सुळका यांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फ़ेडुन जाते.सगळ्यांनी अगदी झोपुन झोपुन खालच्या valley चे आणि fall चे डोळे गरगरवून टाकणारे दर्शन घेतले.कड्याच्या जवळूनच exposed route वरुन सांधण valley च्या कोकणात उघडणारया तोंडाशी पोहोचलो आणि valley चे वरुन दर्शन घेतले.तिथुन परतुन valley च्या जवळुनच चालत valley च्या तोंडाशी पोहोचलो जिथुन आत प्रवेश करता येतो.

सांधण valley हा निसर्गाचा चमत्कार आहे.कातळामध्ये निसर्गनिर्मित एक प्रचंड भेग तयार झाली आहे. साधारण २०० फ़ूट खोल अशी ही भेग आहे.सुरुवातीला ती १५/२० फ़ूट आहे आणि मग वाढत जाउन ती १०० फ़ुटापर्यंत open होत जाते.पावसात valley च्या दोन्ही भिंतींवरुन पाणी आत पडते आणि त्यामुळे आतमध्ये पाण्याची pockets तयार होतात.हे पाणी बर्फ़ासारखे थंड असते.आम्हाला अशी २/४ pockets लागली.त्यातल्या एका pocket मधून जावेच लागते.या pocket मध्ये मे महिन्यात सुद्धा छातीभर पाणी होते.या pocket ची लांबी साधारण २०/२५ फ़ूट आहे.पाणी म्हटल्यावर दंगा होणारच आणि तसा तो झाला सु्द्धा.दोन्ही कडयातून सुटलेले कातळकडे आतमधे पडतात त्यामुळे सांधणच्या बेस ला छोट्यामोठया आणि काही अशा दगडगोट्यांचे bed तयार झाले आहे.काही शिलाखंड तर अजस्त्रच आहेत.प्रचंड आकाराच्या या शिलाखंडामधुन वाट काढत काढ valley च्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो.इथुन खाली पुढे जात येते पण अगदी तळाशी गेल्यावर ५० फ़ूट तुटलेला कडा आहे तो रोपनेच उतरता येतो.त्यामुळे तिथेच थांबलो.या ठिकाणी २०/२५ जण बसतील एवढी प्रचंड शिळा आहे त्यावर सर्व जण बसलो आणि त्या valley च्या सौंदर्यात जणुकाही सामवुन गेलो.१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सर्वजण तो १/१.५ किमीचा Bed पार करत बाहेर आलो.valley च्या तोंडाशी पिण्याच्या पाण्याचे छोटेसे pocket आहे तिथे थांबुन पाणी पिउन विसावा घेतला आणि परत निघालो साम्रदकडे.बाहेर पडल्या पडल्या रतनगड आणि खुटटा धुक्यातुन बाहेर पडलेले असल्यामुळे स्पष्ट आणि फारच मनमोहक दिसत होते.दूरवरचे अलंग,मदन,कुलंग सुद्धा उठून आले होते.साम्रद गावातल्याच एका शाळेच्या ओसरीवर ठेपले,कोथिंबीर वड्या,दही,केक असे मस्त जेवण घेतले आणि सांधण च्या आठवणी मनात साठवत ९ वाजता डोंबिवलीला पोहोचलो.