एक एक मकाण मागे टाकत कात्रज रोड ला लागलो.आणि लागले ते कात्रजचे बोगदे.....काय मजा आल्ये सांगू त्याच्या मधून जाताना.फोटो काढले(ते पुढे गेले कसे ते येईलच).सगळे एकत्र झालो नसरपुर फाट्याजवळ.४ ४.३० तास प्रवास करून थकलो होतो त्यामुळे नाश्ता करायचा होता.एक रस्त्यावरच बस स्टॉप होता.तिथे थांबायचं ठरलं.रस्त्याच्या कडेला एक छोटीशी पायवाट होती.ती रस्त्याच्या थोडी खाली होती.तिथे लावू असा विचार करून गाड़ी उभी करणारच होतो एवढ्यात काय झालं ते समजलंच नाही.बहुदा थकव्या मुळे तोल सांभाळता आला नाही.आणि गाड़ी सकट बाजुच्या खड्ड्यात पडलो.सुदैवाने काही लागलं नाही मला पण जे होऊ नये ते झालं.दोन गोष्टी......एक....मागचं बघायचा आरसा तुटला.....पूर्णपणे.....फ़क्त सांगाडा शिल्लक राहिला.आणि दुसरं म्हणजे पुढचा ब्रेक तुटला.
या दर्शनानेच थक्क व्हायला होतं.बालेकिल्ला,सुवेळा आणि पद्मावती माच्या आणि सभोवतालचा परिसर बघून मन प्रसन्न होते.काही मिनिटात गुंजवणे ला पोहोचलो.गाड्या पार्क केल्या आणि चढायला सुरुवात केली.हा चढ़ आहे तो तुंग सारखा अंगावर येत नाही.वाटेत दोन चार वेला थांबलो.लिम्बू मिठाचा आस्वाद घेतला.पाणी प्यायलो.गप्पा गोष्टी करत आला तो पद्मावती चा चोर दरवाजा.जाताना
कातळातल्या पायऱ्या लागतात.त्या चढल्यावर आपण पद्मावती माचीत प्रवेश करतो आणि जे काय वाटतं त्यावेळी ते शब्दात व्यक्त नाही करता येत.एकदम भरून येत.ज्या महाराजानी २५ व
र्ष इथे घालवली तिथे येण्याचं भाग्य लाभल्याचं जे समाधान होतं त्याला तोड़ नाही.लगेच लागतो तो पद्मावती तलाव.त्याला वळसा घालत पद्मावती मंदिरात पोहोचलो.या मंदिराचं महत्त्व असं की महाराज मोहिमेला निघत तेव्हा पद्मावती देवीचं दर्शन घेत असत आणि सहकार्याना मार्गदर्शन करत असत.शनिवार असल्यामुळे देवळात चांगलीच गर्दी होती.रात्रि झोपायच कुठे हे सुद्धा ठरवायच होतं.पण इतकी भूक लागली होती की आधी तिथेच मस्त पेटपूजा केली.आणि सतरंज्या घालून ताणून दि
ली.अशी मेल्यासरखी झोप लागली आहे की
सांगुन सोय नाही.दुपारचे ४ वाजले होते.आजचा प्लान संजीवनी माची बघायचा होता.त्यासाठी पद्मावती माची मागुन तटबंदी लगत कड्या जवलून पायवाटेने राज वाड्यापर्यंत पोहोचलो.आता फ़क्त चौथरा शिल्लक आहे.आधी इथे लोकानी कमानी पाहिल्या आहेत.
तिथून पुढे लागतो तो तलाव.खास लोकांसाठी.त्याच्या पुढे उजव्या हाताला वाट जाते ती पाली दरवाज्याकडे.तिथपर्यंत जाउन दोन्ही पाली दरवाजे बघून वर आलो.आणि संजीवनी माची कड़े प्रस्थान केले.ही वाट बालेकिल्या खालून कड्या जवळून
जाते.थोड्या फार चढ़ उतराची अणि थोड्या जंगलाची अशी ही वाट मजेशीर आहे.कडा ओलांडून पुढे आलं की मागे वलून पाहिल्यावर दिसतो तो बालेकिल्ल्याचा उभा कडा.तसेच पुढे चालत राहिलो.सूर्य मवालाती कड़े झुकत होता.सगळा आसमंत
मंद अशा पिवाल्या रंगाने भरून गेला होता.त्या वातावरणात पुढे जात राहिलो आणि एकदम दर्शन झालं ते नागमोडी तटबंदी असलेल्या संजीवनी माचीच.थक्कच झालो आम्ही सगले.माचीच्या टोकापर्यंत पोहोचलो.समोर सूर्य मावळत होता.उजव्या बाजूला बेलाग तोरणा मागे बालेकिल्ला आणि डाव्या ताला लांब दिसणारा डूबा .स्तिमित झालो होतो सगले.आता परतायला हवं होत.रात्र पडायला सुरुवात झाली होती.तसेच एकमेकांच्या आधाराने परत आलो.आधी मुक्काम पद्मावती मंदिरात करायच ठरल पण गर्दी बघून
जीव घाबरा घुबरा झाला आणि पाली दरावाज्या मागच्या पहरेकर्याच्या देवडीत मुक्काम करायचा अस ठरल.सगळ्याच्या बैग घेउन आणि मजबूत पाण्याची
सोय करून देवडी गाठली.रात्रि चा बेत फ्राईड राईस होता.तो हाणला आणि गप्पा टप्पा करत झोपी गेलो.रात्रि ठंडी होती आणि पांघरून बेताचीच होती.मग एकमेकांच्या हतापयाचं पांघरू ण करून त्या तेवढ्या जागेत गच्च कोम्बुन गाढ़ झोपलो.
arre ekdam sahi lihilayas... majaa aali.. mastach !! take me to trek some day buddy :)
ReplyDeleteamol from flickr