२१ मे
पहाटे ५ ला घर सोडले.NH-17 वर drive करताना जी मजा येते ती काय ती फ़क्त मला आणि
रोहितलाच माहीत.महाड माणगाव परिसरात शेतीची कामे चालू होती.थोडेसे फ़ोटॊ काढुन पहिला पडाव गाठला....घोणे
काष्ठशिल्प संग्रहालय,कोलाड..........रमेश घोणे या कलाकाराने काष्ठशिल्पांच्या सहाय्याने निसर्गाच्या विवि
ध पैलूंचं घडवलेलं दर्शन थक्क करुन टाकतं.निसर्गप्रेमी रसिकांसाठी ही पर्
वणीच आहे.१
० रु चे माफ़क तिकिट आहे आणि photography मोफ़त आणि मनसोक्त करु शकतो.लाकडापासून बनवलेल्या बाहुल्या,चेहरे,टेलीफोन,table lamps,wall paintings,कासव,मोठा बूट,कुलुप,हत्ती,कंदील अशा वस्तू बघुनच गम्मत वाटते.बाळासाहेब ठाकरे,पु.ल.,येशू यांची शिल्पेही येथे बघायला मिळतात.
दुसरा पडाव होता......उमरठ.....तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा समाधी.पोलादपूरपासून
५ किमी वर
अंबेनळी घाटाच्या रस्त्याने कापडे फाटा लागतो.इथे डावीकडे वळुन एका घाटरस्त्याने आपण उमरठला पोहोचतॊ.वाटेत डावीकडे सावित्री धरण लागते.सिंहगडावर तान्हाजी मालुसरे यानी देह ठेवल्यावर त्यांचे शव मढ्या घाटाने उमरठला आणण्यात आले आणि तिथे नंतर त्यांची समाधी बांधण्यात आली.उमरठ गावी
ग्राम पंचायतीने समाधी
स्थळ बांधले आहे.याच ठिकाणी शेजारी जननी कुंभळजा देवीचे मंदिर आहे.येथुन थोडे पुढे गेल्यावर तान्हाजींचा पुतळा बसवलेले ठिकाण आहे.या ठिकाणच्या झाडाच्या ढो
लीत काही शस्त्रे सापडली.त्यापै
की काही पुण्याच्या केळकर संग्रहालयात आहेत व २ तलवारी येथील शेजारच्या घरातले रहिवासी रामचंद्र पोकळे(कदम) यांच्याकडे बघायला मिळतात.या ठिकाणी ज
वळ डोंगरात निसर्गनिर्मित गुहा आहे.पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.या कामी ग्रामपंचायत सदस्य कळंबे यांच्या पुढाकाराने सुषमा स्वराज यानी १५ लाख देणगी दिली अशी पोकळे यानी माहिती दिली.जवळच ढवळे गाव आहे.चंद्रगडाच्या पायथ्
याचे हे गाव आहे.पुतळ्याच्या ठिकाणाहून चंद्रगडाचे दर्शन होते.त
सेच महाबळेश्वरच्या arthur seat point चे ही दर्शन होते.
तिसरा पडाव होता......कशेडी घाटाच्या माथ्यावरचा अक्कलकोट महाराजांचा मठ........येथुन कशेडी घाटाचे विहंगम दृश्य मन मोहून टाकते.थोडावेळ विश्रांती घेउन आणि थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेउन पुढच्या प्रवासाला निघालो.
चौथा पडाव............all time favorite.......श्री देव परशुराम मंदिर,चिपळुण..........यावेळी मंदिराला जायच्या चिपळुण कडच्या प्रवेशद्वाराने निघालो.हा रस्ता मंदिरा
च्या आवाराजवळ आपल्याला घेउन जातो.देवाचे दर्शन घेउन आणि २ ग्लास सोलकढी घश्याखाली उतरवून पुढे निघालो dream destination कडे................गुहागर............वाटेत रस्त्यावर tp photo
s
ession करुन तब्बल १२ तासानी गुहागर गाठले.संध्याकाळी सागर किनारे थोडं photo session करुन रात्री आईबाबांशी गप्पा मारत आणि हापूस आंब्यांवर ताव मारत जेवण केलं आणि झोपेच्या आहारी गेलो.
२२ मे
विश्रांतीचा दिवस.वाडीत आणि समुद्रावर फोटोसेशन करण्यात दिवस घालवला.paddy मामाला फोन करुन २३/२४ मे ची व्यवस्था करुन ठेवली.साधारण plan डोक्यात होता.
२३ मे
पहाटे ६ वाजता निघालो रत्नागिरीकडे.यावेळी राई-भातगाव पुलामार्गे आणि मग आरे-वारे पुलावरुन रत्नागिरी असा बेत ठरवला.रोहिले-तवसाळ भाग बघितला नसल्यामुळे तो बघायचीउत्सुकता होती.पालशेत सोडलं आणि पाउस शिंतडायला सुरुवात झाली.थोडा वेळ एका park केलेल्या रिक्शेत आडोसा घेतला.पाउस लगेच थांबला.पुढे निघालो.थोड्या वेळाने रोहिल्याच्या निसर्गरम्य अशा परिसरात पोहोचलो.संदर असा छोटासा समुद्र्किनारा,समोर जयगडचा जिंदालचा power project आणि सुंदर असा पूल.मनसोक्त फोटो काढले आणि पुढे निघालो.आदल्या रात्री या भागात पाउस झाल्यामुळे रस्ते,डोंगर ओले झाले होते.अशा रस्त्यावरुन फ़ेरफ़टका म्हणजे एक रोमान्सच आहे.काही वेळातच तवसाळच्या माळावर पोहोचलो.इथे थोडे landscapes मारुन तवसाळ गावात निघालो.रस्त्यावरच उजवीकडे विजयगडाचा बुरुज दिसतो.विजयगडाचा मोह आवरुन गावात पोहोचलो आणि पडावाची(बोट) चौकशी केली.एका गावकरयाने "८ वाजता आहे" असे सांगितले.पडाव पलिकडे जयगड गावात जातो असेही सांगितले.एक तास थांबण्यापेक्षा भातगाव पुलावरुनच जावे असे ठरवून परत फ़िरलो भातगावच्या दिशेत.इथे कुडली आणि पडवे अशी गावे लागतात.त्यापैकी पडवे गावातून डिपको मिळतात पण 2 wheelar जाउ शकत नाही तिथपर्यंत.त्यामुळे कुडलीला जायचे ठरवले.तवसाळच्या माळावर कुडली गाव लागते.अत्यंत टुमदार असे हे गाव.landscapes साठी अतिशय संदर ठिकाण.या गावी गवताची "उडवी" बघायला मिळाली.भात झोडपल्यानंतर या उडव्यांमध्ये साठवले जाते.एकेका उडवीत ७००/८०० किलो धान्य राहू शकते.amazed to know this!!ही सर्व माहिती दीपक गडदे यानी उपलब्ध करुन दिली.कोकणात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजुला झेंडे खोवलेली ठिकाणे दृष्टीस पडतात.इथे लोक नवस बोलतात.काही दगड रचून त्यात झेंडे उभे करतात.काही ठिकाणी झाडावर झेंडे लावतात.कुडलीत खाली जेट्टीपर्यंत पोहोचलो.पलीकडे समोर कुडली-जांभारी आणि उजवीकडे धाकटी जांभारी अशी गावे दिसतात.या ठिकाणी जयगड खाडी यु टर्न घेते ते स्पष्टपणॆ दिसू शकते.५ मिनिटात आपण पलिकडे पोहोचतो.३० रु तिकिट आहे(bike साठी) आणि डिपको सकाळी ६.१५ ते संध्याकाळी ६.३० चालु असते.अगदी पावसातही.(contact person कन्हैया तरवाला,कुडली(८९७५५९३५७७/8975593577) आरे-वारे पुलावरुन जायचा बेत असल्यामुळे गाडी नेवरे मार्गे रत्नागिरी रस्त्यावर घातली.वाटेत २ गावकरी भेटले.त्याना रत्नगिरी पर्यंत लिफ़्ट दिली.त्यामुळे आरे वारे रस्त्यावर त्यावेळी photo session करता नाही आले.पण त्याच रस्त्याने परतायचे असल्यामुळे निर्धास्त होतो.१० वाजता रत्नागिरीत पद्माकर मामाकडे दाखल झालो.इडलीचा नाश्ता followed by "अतिथी" भोजनालयातले उत्तम जेवण......It was treat.मामा १ मे ला रत्नागिरी दूरदर्शन केंद्रामधून voluntary घेउन retire झाला.त्यामुळे he was free. संध्याकाळी ४.३० ला रत्नदुर्ग पहायला बाहेर पडलो.रत्नदुर्ग अतिशय सुंदर.भगवती मंदिर,नर्मदा सीमेंटची जेटी,कडेलोट point,light house सगळे कसे रम्य.भरपूर फोटो काढुन मग मांडवी बंदरावर पोहोचलो.तिथे भेळ followed by नारळपाणी.once again it was treat.मांडवी बंदर काही मला तितकेसे आवडले नाही.एक तर "चौपाटी" झाली आहे आणि त्यात गर्दी.त्यामुळे जीव घाबराघुबरा होतो.
मामाच्या घराच्या व्हरांड्यात चिमण्या,साधे कावळे,जंगली कावळे,साळुंख्या येत असतात.त्यांचे थोडे फोटॊ काढले.मागच्या फ़णसावर कोकीळ-कोकीळा,बुलबुल वास्तव्य करतात.वर्षातून दोनदा ससाणा येतो.सगळी मज्जाच मज्जा.दिवस मजेत गेला.